राजा म्हणाला, ''असें असेल तर मी सर्व मृगांना अभय देतों.''

बोधिसत्त्व म्हणाला, ''महाराज या उद्यानांतील मृगानांच आपण अभय देतां. पण अरण्यांतील इतर श्वापदांनी काय करावें ? त्यांची गति काय होणार ?''

राजानें सर्व प्राण्यांना अभयदान देण्याचें अभिवचन दिल्यावर बोधिसत्त्व त्या ओंडावरून उठला, आणि त्यानें राजाला शील राखण्यासाठीं व धर्मानें राज्य करण्यासाठीं उपदेश केला. नंतर राजानें त्या सर्व मृगांना कुरणांतून मोकळें केलें. व ते अरण्यांत आपल्या मूळच्या ठिकाणीं गेले.

तेथें त्या गर्भिणी मृगीला एक सुंदर पुत्र झाला तो लहानपणी वारंवार शाखमृगाजवळ जात असे. आईला जेव्हां ही गोष्ट समजली तेव्हा ती त्याला म्हणाली, ''बाबारे, + तुला तुझें कल्याण व्हावें अशी इच्छा असेल तर शाखमृगाचा सहवास न करितां न्यग्रोधाची संगति धर. न्यग्रोधाबरोबर मरणें श्रेयस्कर आहे; पण शाखाबरोबर जगणें श्रेयस्कर नाहीं.''
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
+ मूळ गाथा--
निग्रोधमेव सेवेय्य न साखं उपसंवसे ।
निग्रोधस्मिं मतं सेय्यो यंचे साखस्मिं जीवितं ॥
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to जातक कथासंग्रह


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
सापळा
झोंबडी पूल
श्यामची आई
गांवाकडच्या गोष्टी
गावांतल्या गजाली
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
खुनाची वेळ
अजरामर कथा
भारताची महान'राज'रत्ने
जगातील अद्भूत रहस्ये
रत्नमहाल
गरुड पुराण- सफल होण्याचे उपाय