सुरुवातीच्या काही ग्रंथांमध्ये तसेच आदिपर्वामध्ये, महाभारताचे काही अध्याय हे भारत-राजवंशाच्या नोंदी विषयीच्या इतर अठरा पुस्तकांपैकी पहिले पुस्तक आहे. यामध्ये भारत राजवंशाचे वंशज कालक्रमानुसार नोंदवले गेले आहेत. राजा मनुपासून सुरू झालेल्या या वंशाबद्दल शिवाय त्याहून अधिक, काही राजे व त्यांच्या राजवंशांचा तपशीलवार उल्लेख यात करण्यात आला आहे.

एखाद्या काल्पनिक कथेसाठी इतके राजे व त्यांचे वंश या सगळ्याची केवळ कल्पनाच करणे हे अकलनीय आहे. केवळ एका कथेसाठी इतकी पात्र लिहिणे जे आजच्या लेखकाला पटत नाही. आजच्या काळात आपण जे.के.रॉलिंगच्या हॅरी पॉटरला जर खरे मानु शकतो तर महाभारतात त्यावेळचे अनेक कालानुरुप दाखले आहेत. त्यावेळच्या राजा महाराजांचे जीवन व आजुबाजुची समकालीन उदाहरणे यांची ही केवळ कल्पना करणे हे असामान्य वाटते. आपण आत्तापर्यंत वाचलेल्या काही काल्पनिक कथांमध्ये कोणत्याही कार्यात्मक कथा बांधणीसाठी फक्त पाच सहाच राजे त्यांचे वंश पुरेसे असतात. तिथे महाभारतात संपुर्ण जगभरातील राजे व त्यांचे वंश याचा उल्लेख आहे.

त्याकाळच्या विविध जागांचा उल्लेख आहे ज्या जागा केवळ भारतात नाही तर भारता बाहेरच्या देशात आहेत. हे देश भारतीय उपखंडाचा एक भाग होते. त्याकाळी ह्या जागा अखंड भारतात होत्या. उदा. गांधारीचा देश गांधार देश म्हणजे साधारण आजचा अफगाणिस्ताना जवळचा प्रभाग.

महाभारताचे आणि कुरुक्षेत्राचे समर्थन करणार्‍या लोकांचा विचार केल्यास आपल्याला असे जाणवते की या सत्यात घडलेल्या ऐतिहासिक घटना आहेत. या काल्पनिक घटना असत्या आणि लेखकाचा हेतू एक कविता किंवा काल्पनिक कथा लिहिण्याचा मनसुबा असता तर लेखकाने त्याचा कुठेतरी उल्लेख केला असता.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to महाभारत सत्य की मिथ्य?


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
सापळा
झोंबडी पूल
खुनाची वेळ
गांवाकडच्या गोष्टी
श्यामची आई
गावांतल्या गजाली
लोकभ्रमाच्या दंतकथा
वाड्याचे रहस्य
शिवाजी सावंत
रत्नमहाल
९६ कुळी मराठा